Home » बातम्या

बातम्या

12
0

बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…..

 Dipika Ramkrishna Patil   

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल पासून Unified Pension Scheme लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळणार आहे.

केंद्र सरकार 1 एप्रिल पासून Unified Pension Scheme लागू करणार आहे. या नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत Unified Pension Scheme ची घोषणा केली होती. ही स्कीम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. जे कर्मचारी आधीच नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये रजिस्टर आहेत, त्यांनाच या योजनेचा फायदा होणार आहे.

काय आहे UPS Scheme ?

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Unified Pension Scheme ( UPS ) जाहीर केली, ज्याचा उद्देश निवृत्ती नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना स्थिरता, प्रतिष्ठा आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, त्यांचे कल्याण आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे आहे.

सध्या, सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ( NPS ) अंतर्गत समाविष्ट केले जाते. हे कर्मचारी NPS चालू ठेवू शकतात किंवा UPS योजनेत बदलू शकतात. तसेच , एकदा कर्मचाऱ्यांनी UPS निवडल्यानंतर , निर्णय अंतिम असतो ,त्यात बदल करता येत नाही.

राज्य सरकारे देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS योजना स्वीकारू शकतात आणि अंमलात आणू शकतात. महाराष्ट्र हे UPS लागू करणारे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 25 ऑगस्ट , 2024 रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हि योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. जर सर्व राज्यांनी UPS योजना स्वीकारली तर त्याचा फायदा संपूर्ण भारतातील NPS योजने अंतर्गत येणाऱ्या 90 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होईल.

युनिफाइड पेन्शन योजनेचे तपशील :

योजनेचे नाव:युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS )
रोजी जाहीर केले24 ऑगस्ट, 2024
रोजी सूचित केले24 जानेवारी, 2025
अंमलबजावणीची तारीख1 एप्रिल, 2025
लाभार्थीकेंद्र सरकारी कर्मचारी
कर्मचाऱ्यांचे योगदानमूळ पगाराच्या 10% + महागाई भत्ता

सरकारचे योगदान: मूळ पगाराच्या 18.5% + महागाई भत्ता

फायदे :

  1. किमान 25 वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती पूर्वीच्या गेल्या 12 महिन्यांत सरासरी मूळ पगाराच्या 50% पेन्शन.
  2. किमान 10 वर्षाच्या सेवेच्या निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रूपये.

कसे ठरतील केंद्रीय कर्मचारी UPS साठी पात्र?

  1. NPS अंतर्गत समाविष्ट असावा आणि 1 एप्रिल, 2025 रोजी सेवेत असणारा विद्यमान केंद्र सरकारचा कर्मचारी.
  2. 1 एप्रिल, 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत रूजू होणारे नवीन कर्मचारी.
  3. केंद्र सरकारचा असा कर्मचारी जो NPS अंतर्गत 31 मार्च, 2025 रोजी किंवा त्यापूर्वी मूलभूत नियम 56(जे) अंतर्गत स्वेच्छेने निवृत्त झाला आहे.
  4. NPS अंतर्गत येणारा केंद्र सरकारचा निवृत्त कर्मचारी ज्याचा UPS चा पर्याय निवडण्या पूर्वीच मृत्यू झाला आहे, त्या कर्मचाऱ्याचा कायदेशीररित्या विवाहित जोडीदार.

अशा प्रकारे आहे केंद्र सरकारची Unified Pension Scheme (UPS) योजना.

मनोरंजन

खेळदेश-विदेशयोजनामहाराष्ट्रराजकारण

डिजिटल युगातील माहितीची क्रांती : संधी आणि आव्हाने

2 0 आजच्या काळात डिजिटल युग म्हणजे केवळ तंत्रज्ञानाची प्रगती नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात घडलेला…

स्पर्धा परीक्षेतील वास्तव

3 0 आजच्या युगात स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळविण्याची एक पायरी राहिलेली नाही, तर समाजातील…

स्पर्धा परीक्षा नावाच चक्रव्यूह

7 0 आजच्या काळात ‘ स्पर्धा परीक्षा ‘ हा शब्द ऐकताच हजारो युवक-युवतींच्या मनात आशा…

स्पर्धा परीक्षा आणि मानसिक ताण

2 0 भारतातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा हा करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. UPSC , MPSC…

आत्मनिर्भर भारत – स्वावलंबनाचा नवा महामार्ग

47 0 भारत हा देश प्राचीन काळापासूनच संपन्न, समृद्ध व ज्ञानपरंपरेत आघाडीवर राहिलेला आहे. मात्र आधुनिक…

कबुतर, हत्ती आणि वराह जयंतीच्या प्रश्नांमध्ये अडकलेला महाराष्ट्र बळीराजाचे प्रश्न सोडवू शकेल का ?

65 0 महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालू आहे, ते पाहून सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न ऊभा राहतो…

हे अत्यंत महत्वाचे कार्ड प्रत्येक नागरिकाकडे असायलाच हवेत.

72 0 वाचकहो आजच्या डिजिटल युगात एक नागरिक म्हणून आपली ओळख आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी…

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘ महिला समृद्धी योजना ‘

152 0 भारतामध्ये महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे केंद्र व राज्य सरकारांच्या…

डिजिटल शेती – भारतीय शेतकऱ्यांसाठी एक क्रांती

74 0 भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील जवळपास 55% लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून…

पंढरपुरचा विठोबा – श्रद्धेचा महासागर

120 0 महाराष्ट्राच्या सोलापुर जिल्ह्यातील पंढरपुर हे शहर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे , धार्मििक आणि…

2025 मध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेग वाढतोय – काय आहे यामागच रहस्य ?

85 0 2025 हे वर्ष भारतासाठी डिजिटल क्षेत्रात क्रांतिकारक ठरते आहे . मोबाईल इंटरनेटचा वेग , UPI…

हिंदी भाषा आणि महाराष्ट्रातील राजकारण : एक सविस्तर अभ्यास.

106 0 वाचकांनो तुम्हाला माहितच असेल की , इयत्ता 1ली ते 5 वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा…

iran-Israel War सख्खे मित्र कसे बनले एकमेकांचे पक्के वैरी ?

100 0 वाचकांनो तुम्हाला माहित असेलच इरान आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सुरू अएसलेल्या युद्धाबद्दल…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ” अच्छे दिन “.

101 0 वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत…

पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षाही ऊंच असा पुल आपल्या भारतात आहे. जाणून घ्या कुठे आहे हा पुल ?

29 0 वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात ऊंच रेल्वे पुल , अगदी पॅरिस मधील आयफेल टाॅवर…

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान.

20 0 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी 27 मे , 2025 रोजी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights